बिग बॉस ९ फेम मंदाना करिमी हिने अलिकडेच बॉलिवूड हंगामाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने इराणला जाण्याचा निर्णय सांगितला आहे. अभिनेत्रीने दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणालीये की, "मी अशा स्वतंत्र्य इराणबद्दल कल्पना करते, जे राष्ट्र महिलांसाठी मुक्त राष्ट्र असेल. जिथे महिला त्यांना जे हवे ते करू शकतील, त्यांना जे हवे ते कपडे घालू शकतील आणि त्यांना हवे त्या विद्यापीठात जाऊन त्या शिक्षण घेऊ शकतील. मी असा इराण पाहतेय, ज्याचे इतर मध्य पूर्वेतील राष्ट्रांशी चांगले संबंध असतील, जिथे इराण हा राष्ट्र इतर कोणासाठीही धोका नसेल, तर एक राष्ट्र असेल. प्रगतीच्या दृष्टीने पुढे जाणारा राष्ट्र म्हणून पाहतेय."
advertisement
मंदाना करिमी पुढे म्हणाली की, "हे संकट संपल्याची घोषणा होताच मी भारतातून निघून जाणार आहे. मी माझ्या बॅगा पॅक केल्या आहेत आणि मी भारतही सोडत आहे. माझा प्लॅन तयार झालेला आहे, कारण मला असं वाटतंय की माझं आणि भारताचं नातं संपत आलंय." मंदानाने भारतातील तिच्या अनुभवांबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. तिने स्पष्ट केले की, "मी खूप लहान असतानाच भारतात आली आहे. मला इथे आल्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनयात करिअर करायला मिळाले. तसेच मला इथे खूप मित्रही मिळाले. पण दुर्दैवाने, मी निदर्शनांमध्ये सामील झाले आणि इराणबद्दल जाहीरपणे बोलल्यावर माझे अनेक मित्र माझ्यापासून दुरावले," असं मंदाना म्हणाली.
"मला वाटतं की भारताने माझा विश्वासघात केला आहे. भारताने मला जे द्यायचं होतं ते दिलं. पण आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. मी पुन्हा इराणमध्ये राहायला जाणार आहे, असं मला वाटतंय." असं मंदाना करीमीने सांगितलं.
