'दशावतार' चित्रपट करायचं कधी ठरलं?
एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सुबोध खानोलकर म्हणाला,"ओशन फिल्म कंपनी या आमच्या निर्मितीसंस्थेद्वारे चित्रपटाची निर्मिती करावी, असा आमचा विचार होता. या चित्रपटाची गोष्ट मी लिहेन असं सुरू होतं. त्यावेळी जी गोष्ट सुचली ती दशावतार, कोकण या पार्श्वभूमीवरची गोष्ट सुचली. गोष्ट लिहिल्यानंतर सगळ्यात पहिले असं ठरलं की आव्हानात्मक भूमिका आहे आणि एकचं नाव डोळ्यासमोर होतं ते म्हणजे दिलीप प्रभावळकर. त्यावेळी त्यांची आणि माझी ओळख नव्हती. इकडून-तिकडून त्यांचा नंबर मिळवला आणि भेटण्यासाठी परवानगी घेतली. दिलीप काका संपूर्ण संहिता हातात असल्याशिवाय त्यातले संवाद, बारकावे माहित असल्याशिवाय सहसा होकार देत नाहीत. माझ्याकडे तर फक्त गोष्ट होती. त्यांना ती थोडीशी गोष्ट ऐकवली आणि आमच्या अर्ध्या तासाची मिटींग साडे तीन -चार तास चालली. तेव्हा मला कुठेतरी आशा वाटू लागली होती. मी डोक्यात फिक्स केलं होतं जर दशावतारला दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला तर गोष्ट गुंडाळून ठेवायची. कारण ही गोष्ट इतर कोणीही सादर करू शकत नाही".
advertisement
Sonali Kulkarni : सिद्धेश्वर एक्सप्रेसने रात्रीचा प्रवास, सोनाली कुलकर्णीला वाटत होती एका गोष्टीची भीती, VIDEO
'दशावतार'साठी दिलीप प्रभावळकरांचीच निवड का?
सुबोध खानोलकर म्हणाला,"दशावतार'ची कथा, या चित्रपटातील बाबुली मेस्त्रीची भूमिका एका वृद्ध दशावतारी कलाकाराची आहे. या पात्राला अभिनय, लूक्स अशा अनेक गोष्टींबद्दल प्रचंड छटा आहेत. हे सगळं करू शकणारे, या भूमिकेची खोली माहिती असणारे दिलीप प्रभावळकरच आहेत हे कुठेतरी डोक्यात फिट होतं. त्यामुळे मी त्यांना विचारलं..आणि पटकथा लिहिण्याआधीच त्यांच्याकडून मला तत्त्व: होकार आला.