रजनीकांत यांना 1975 साली वयाच्या 25व्या वर्षी Apoorva Ranagangal या तमिळ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. सिनेमात त्यांचा केवळ 15 मिनिटांचा रोल होता. त्यानंतर भुवन ओरू केल्विकुरी या सिनेमानं रजनिकांत यांचं आयुष्य बदललं. पुढे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. चाहते त्यांना देव मानू लागले.
हेही वाचा - Randeep Hooda -Lin Laishram : मणिपुरी पद्धतीने लग्न, आता रिसेप्शन पार्टीत रोमँटिक झाले रणदीप-लिन, Photo
advertisement
रजनीकांत यांचं खरं नाव रजनीकांत नाहीये हे फार कमी लोकांना माहिती आहे. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजाराव गायकवाड असं आहे. एका मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. फार कमी वयात त्यांची आई जाजीबाई यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या वडिलांचं नाव रामोजी राव. ते एक पोलीस कॉन्स्टेबल होते. रजनीकांत यांना 3 भाई-बहिण आहे. त्यात ते चौथे आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती तशी बेताची होती. म्हणून रजनीकांत यांनी फार लहान वयात काम करायला सुरूवात केली. अभिनय क्षेत्रात येण्यआधी ते बस कंडक्टर म्हणून काम करायचे.
रजनीकांत यांचं नाव बालचंदर दिग्दर्शित अपूर्व रागांगल (1975) या तमिळ सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी बदलण्यात आलं. सिनेनिर्माते के बालचंदर यांनी शिवाजीराव गायकवाड यांना रजनीकांत हे नाव दिलं. बालचंदर यांनी अभिनेते शिवाजी गणेशन यांच्या नावाशी कोणाचा गोंधळ होऊ नये म्हणून रजनीकांत यांना त्यांच्या मंचाचं नाव दिले.
अभिनेते रजनीकांत हे अस्सल मराठी देखील बोलतात. सध्या ते चेन्नई येथे राहतात. वयाच्या 73व्या वर्षी देखील ते सिनेमात काम करत आहेत. नुकताच त्यांचा जेलर हा सिनेमा देखील रिलीज झाला. लवकरच त्यांचे काही नवे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रजनीकांत सध्याचे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. त्यानी जेलर सिनेमासाठी 210 कोटी मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय.
