टीझरमधील 'त्या' विधानांमुळे खळबळ
श्रीदेव नंबुदिरी या पेशाने जीवशास्त्रज्ञ (Biologist) असलेल्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर त्यांच्या सारासार विवेकाला धक्का बसला आहे. टीझरमध्ये केरळची प्रतिमा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि नकारात्मक स्वरूपात मांडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चा अंगावर शहारे आणणारा फर्स्ट लूक आऊट; 'या' शुभदिनी होणार रिलीज
advertisement
याचिकेत नमूद केल्याप्रमाणे, "या चित्रपटाच्या टीझरमध्ये केरळ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील तीन मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. या मुली कशा प्रकारे दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकतात, ज्यांनी लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं धर्मांतर केलं आणि देशाची लोकसंख्या बदलण्याचा प्रयत्न केला, असं यात चित्रित केलं गेलं आहे. टीझरमधील संवाद देशातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकतात."
केरळच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह?
याचिकाकर्त्याचा मुख्य आक्षेप हा चित्रपटाच्या नावावर आहे. टीझरमध्ये इतर राज्यांतील कथा असल्या तरी चित्रपटाचं नाव 'द केरला स्टोरी' ठेवल्यामुळे प्रेक्षकांमध्ये असा समज निर्माण होतो की, या सर्व भयानक घटना केवळ केरळमध्येच घडत आहेत. यामुळे केरळच्या संपूर्ण लोकसंख्येला कलंकित केलं जात असून, प्रादेशिक आणि जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
प्रदर्शनावर बंदी येणार का?
हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मात्र, याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यानुसार चित्रपटाच्या प्रदर्शनावर आणि सार्वजनिक प्रदर्शनावर तात्काळ स्थगिती आणली जावी आणि केंद्र सरकारने या प्रकरणातील फेरविचार याचिकेवर (Revision Petition) लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि तो निर्णय येईपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन रोखून धरावे, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
