जालना शहरात भव्य असा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे. परिसरात छान असे उद्यान आहे. या उद्यानाकडे केवळ शिवजयंती आली तरच लक्ष दिले जाते. रंगरंगोटी केली जाते. अन्य दिवसांत साधी स्वच्छता देखील केली जात नाही. उद्यानात बसवलेले कारंजे चोरी जातात.
Success Story : तरुण शेतकऱ्याने केला कलिंगडाचा यशस्वी प्रयोग, 65 दिवसांत 5 लाख कमाई
advertisement
उद्यानाच्या बाजूने झालेले काम देखील दर्जाहीन झाले आहे. त्यामुळे आम्ही भीक मागून निधी गोळा करायचे ठरवले आहे. आम्हाला गरिबातील गरीब व्यक्तीने देखील पैसे दिलेत. हे पैसे आम्ही प्रशासनाला देऊ आणि या पैशातून महाराजांसाठी चांगले काम करवून घेऊ असे आंदोलक किरण देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकीकडे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत असताना जालन्यात मात्र शिवप्रेमींना असे आंदोलन करायची वेळ आल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळाले. या आंदोलनाची दखल प्रशासनाकडून घेतली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





