विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी नुकतीच Curly Tales ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये दोघांनी जेवणाच्या सवयींविषयी सांगितलं. याच वेळी विवेक यांनी सुरुवातीला महाराष्ट्रीयन जेवणाविषयी त्यांची काय रिॲक्शन होती? याविषयीदेखील सांगितलं.
'द बंगाल फाइल्स' वरुन मोठा राडा! विवेक अग्निहोत्रीविरोधात FIR दाखल; नेमकं प्रकरण काय?
पल्लवी जोशी महाराष्ट्रीयन असल्यामुळे लग्नानंतर त्यांनी विवेकला महाराष्ट्रीयन जेवण खाऊ घातलं. मात्र ती म्हणाली, 'विवेक मला सतत म्हणायचा की काय हे गरिबांचं जेवण आहे'. यावर उत्तर देताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, "मी दिल्लीचा होतो त्यामुळे मला कबाब, मटण, चिकन, जेवणात मसाला, तूप याची सवय होती. तर ही मला म्हणायची, 'वरण भात खा, कढी खा', मराठी लोकांचं जेवण हेल्थफुल असतं. ते पाहून मला कल्चर शॉक लागला."
advertisement
दरम्यान, 1990 च्या दशकात, एका टीव्ही प्रोजेक्टसाठी विवेक आणि पल्लवीची भेट झाली होती. सुरुवातीला ही नुसतीच प्रोफेशनल भेट झाली होती. पण काम करताना दोघांच्या विचारांत एक वेगळी जुळवाजुळव दिसू लागली. विवेकला पल्लवीचं शांत स्वभाव, स्थिरता आणि तिचं कामावरील प्रेम खूप भावलं. तर पल्लवीला विवेकचा धाडसी, नेहमी वेगळं करण्याचा हट्ट असलेला स्वभाव आवडू लागला. काही काळ त्यांनी एकमेकांना चांगलं ओळखून घेतलं. फार गाजावाजा न करता, दोघांनी त्यांचं नातं खूप प्रायव्हेट ठेवलं. आज ते मस्त संसार एन्जॉय करत आहेत.
