दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर केएमपीएमएलला मुहूर्त
मोठ्या संख्येने बस रस्त्यावर धावून त्या सेवेला पूरक होतील यात सुलभआणि मुबलक प्रमाणात पॉइंट टू पॉइंट' स्वस्त दरात सेवा मिळेल आणि प्रदूषणाला आळा बसेल, यासाठी सरकारने एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याच्या निर्णयाला 14 मार्च 2024 मध्ये मान्यता दिली होती. पण या सेवेच्या निमित्ताने स्थापन केलेल्या केएमपीएमएलच्या रजिस्ट्रेशनला मुहूर्त मिळत नव्हता. आता अखेर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया नुकतीच पार पडल्याने आता पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
advertisement
'या' प्रक्रिया आता पार पडणार
कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर शहराचा अपवाद वगळता अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडीत परिवहन सेवा सुरू नाही. त्यामुळे संबंधित शहरांमध्ये ई-बस एकत्रित सेवा चालविण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण पार पडून मार्ग आणि बसथांबे निश्चित करणे, बस टर्मिनल, डेपो उभारणे त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग नेमणे या सर्व यंत्रणेसाठी लागणाऱ्या खर्चाचे नियोजन करणे पुढचा टप्पा आहे.
पीएमर्ट योजनेंतर्गत दाखल
पंधराव्या वित्त आयोगाच्या मंजूर निधीतून केडीएमटी उपक्रमाकडून 207 ई-बस भाडेतत्त्वावर चालवल्या जाणार होत्या, परंतु तीन वर्षांत केवळ 10 ई-बस उपक्रमात दाखल झाल्या आहेत. उर्वरित बस कधी दाखल होतील? होतील की नाही याबाबत साशंकता कायम असताना एकत्रित परिवहन सेवा चालविण्यासाठी कल्याण डोंबिवलीसह भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर अशा प्रत्येक शहरांसाठी पीएमई योजनेअंतर्गत दाखल होणाऱ्या 100 बसचा वापर केला जाणार आहे.
