Weather Alert: वारे वाहणार, विजा कडाडणार, महाराष्ट्रावर अस्मानी संकट, 11 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेची लाट असतानाच हवामानाचं नवं संकट आलं आहे. 14 मार्चला 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट असून काही जिल्ह्यांत पारा चाळिशी पार गेला. आता मात्र, हवामानात मोठे बदल जाणवत असून राज्यावर अस्मानी संकट घोंघावत आहे. आज, शनिवारी मुंबईसह चार जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट असेल. 14 मार्चचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विदर्भात उन्हाचे चटके जाणवत असतानाच आकाशात ढग दाटले आहेत. आज गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत विजांसह मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर नागपूरसह काही जिल्ह्यांना कोणताही महत्त्वाचा इशारा देण्यात आलेला नाही. परंतु, 15 मार्चपासून संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे. कमाल तापमान 38 ते 41 अंशांच्या दरम्यान कायम राहील.
advertisement










