अंबरनाथमार्गे थेट मुंबई गाठणे होणार सोपे
मेट्रो प्रकल्पाचा विस्तार सध्या मुंबई शहरापासून ते अनेक उपनगरापर्यंत विस्तारात आहे. त्यातील एका मेट्रो मार्गिका म्हणजे बदलापूर ते कांजूरमार्ग. पण आता हा विस्तार बदलापूरपर्यंत मर्यादित न राहता थेट टू वे मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे अंबनरनाथपर्यंत जोडला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचा फायदा फक्त या दोन शहरांपुरता मर्यादित न राहता उल्हासनगर, शहाड आणि विशेषतहा कल्याण शहरालाही होणार आहे.
advertisement
एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून काटई नाका ते बदलापूर दरम्यान मेट्रोचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे या भागातील प्रवास अधिक सोयीचा आणि जलद होईल.
ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गाला मिळणार नवा विस्तार
याशिवाय ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण करून कल्याणहून उल्हासनगरमार्गे अंबरनाथपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या विस्तारीकरणासाठी 183 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा विकास होणार असून मोठी गृहसंकुले उभी राहण्याची शक्यता आहे.
कांजूरमार्ग-काटई नाका-बदलापूर या सुमारे 17 किलोमीटर परिसरातील गावांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होईल. मेट्रो सेवा तळोजाशी जोडली जाणार असल्याने त्या भागातही वेगाने नागरीकरण होईल.
औद्योगिक पट्ट्यातील कामगारांसाठी ही मेट्रो विशेष फायदेशीर ठरणार आहे. अंबरनाथ, आनंदनगर, पालेगाव आणि एमआयडीसी परिसरातील कामगारांना जलद आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल. सध्या रेल्वेवर अवलंबून असलेल्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
