मेट्रोच्या रात्रंदिवस चालणाऱ्या कामांमुळे विद्यार्थी त्रस्त
कल्याण आणि डोंबिवली शहरात सध्या मोठ्या प्रमाणात मेट्रोची काम सुरु आहेत, यामुळे शहरातील जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहे. या सर्वांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते आणि यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचणे अत्यंत आवश्यक असते.मात्र या कामामुळे याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
त्याचबरोबर शिळफाटा रोड, कल्याण-मुरबाड मार्ग तसेच इतर प्रमुख रस्त्यांवर सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे चालू आहेत. या सर्व कामांमुळे रोज सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
विद्यार्थी केंद्रावर वेळेत कसे पोहोचणार?
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये, तणाव वाढू नये यासाठी ही कामे तात्पुरती थांबवावीत अशी मागणी डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटनेने केली आहे. संघटनेने स्पष्ट केले आहे की वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.
या मागणीसंदर्भात संघटनेचे अध्यक्ष दत्ता माळेकर आणि सरचिटणीस किशोर सोरखादे यांनी एमएमआरडीए तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत मेट्रो आणि प्रमुख रस्त्यांची कामे तात्पुरती स्थगित ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.
