TRENDING:

Health Tips : जेवताना या 3 गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा शरीर अनेक आजारांनी होईल ग्रस्त!

Last Updated:

जेव्हा शरीरात समस्या उद्भवतात, तेव्हा सेल्समध्ये जळजळ (इन्फ्लेमेशन) निर्माण होते. अतिरेकी जळजळ दीर्घकाळ टिकल्यास शारीरिक दुखापती, त्वचेवरील समस्या आणि सूज होते. मोबाइलसारख्या व्यत्ययामुळे जेवणात जळजळ वाढते. नैसर्गिक अन्न, नियमित व्यायाम, योग्य झोप आणि ध्यान जळजळ कमी करण्यात मदत करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शरीरात जेव्हा कोणतीही समस्या येते, तेव्हा पेशींमध्ये जळजळ तयार होते. ताप असो किंवा बाहेरील सूक्ष्मजंतूंचा हल्ला, प्रत्येक कठीण परिस्थितीत पेशींमध्ये जळजळ तयार होते, जी शरीराला बरे करते. काही काळ ही जळजळ झाली तर ती शरीरासाठी चांगली असते, पण जर जळजळ पेशींमध्ये जास्त वेळ राहिली तर ती खूप हानिकारक ठरते. तुमच्या शरीरात सतत वेदना होत राहतील. त्वचेवर समस्या दिसू लागतील. ही जळजळ सूजेत रूपांतरित होईल, जी आपल्यासाठी खूप हानिकारक ठरेल. मात्र, आहारात अँटी-इंफ्लेमेशन (जळजळ कमी करणारा) आहार घेतल्यास ही समस्या सुटू शकते, पण आजकाल आपण खाताना काही चुका करतो, ज्यामुळे शरीरात जळजळ निर्माण होते.
News18
News18
advertisement

जेवताना मोबाईलपासून दूर राहा

इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात की, जेवताना टीव्ही पाहणे, व्हॉट्सॲप वापरणे किंवा इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया वापरल्याने आपल्या शरीरात जळजळ वाढते. त्यामुळे जेव्हा तुम्ही जेवत असाल तेव्हा चुकूनही अशा गोष्टी करू नका. आजकालची मुले आणि तरुण पिढी मोबाईलशिवाय जेवत नाहीत. पण असे करणे चुकीचे आहे, यामुळे पेशींमध्ये जळजळ होऊ शकते.

advertisement

जळजळीमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि लठ्ठपणासारखे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे जळजळ दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारात अँटी-इंफ्लेमेटरी फूडचा (जळजळ कमी करणारा आहार) समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, बिया, हळद, बीट इत्यादींचे सेवन केल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आजकल डॉक्टर अँटी-इंफ्लेमेटरी फूड घेण्याचा सल्ला देतात. मात्र, केवळ अँटी-इंफ्लेमेटरी आहार घेतल्याने जळजळ पूर्णपणे कमी होत नाही. यासाठी आणखी काही गोष्टी करणे आवश्यक आहे.

advertisement

आहारासोबत आणखी काय महत्त्वाचे?

क्लिनिकल डायटिशियन सीव्ही ऐश्वर्या यांनी सांगितले की, अँटी-इंफ्लेमेटरी आहारात तुम्हाला संपूर्ण धान्य, पोषक तत्वांनी परिपूर्ण हेल्दी फॅट्स, फायबर इत्यादींचे सेवन करावे लागेल. यासोबतच तुम्हाला प्रोसेस्ड फूड घेणे बंद करावे लागेल. जास्त साखर, मीठ, अनहेल्दी फॅट घेऊ नका. अँटी-इंफ्लेमेटरी फूडमध्ये जास्त बेरी, हिरव्या पालेभाज्या, फुलकोबी, कोबी, आले, लसूण, बदाम इत्यादींचा समावेश असतो.

advertisement

आहारासोबतच जळजळ कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि चांगली झोपही आवश्यक आहे. सीव्ही ऐश्वर्या म्हणाल्या की, जर तुम्ही तणावाखाली असाल, तर त्यामुळे शरीरात जास्तीत जास्त जळजळ होईल. त्यामुळे तणावाला कधीही आपल्यावर नियंत्रण मिळवू देऊ करू नका. तणाव प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण तो मॅनेज करणे महत्त्वाचे आहे. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला योगा आणि ध्यानावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. योगा आणि ध्यानाने तणाव जातो. याशिवाय मित्र आणि प्रियजनांशी बोलणे देखील खूप फायदेशीर ठरते.

advertisement

हे ही वाचा : Hair care tips: कोंड्यावर घरगुती उपाय, कधीच जमणार नाही डोक्यावर पांढरा थर!

हे ही वाचा : 'हे' मध आरोग्यसाठी ठरेल अमृत, जाणून घ्या त्याचे फायदे

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : जेवताना या 3 गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा शरीर अनेक आजारांनी होईल ग्रस्त!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल