TRENDING:

Health Tips : पाणी पिण्याचे योग्य नियम कोणते? जाणून घ्या, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे!

Last Updated:
impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शरीराचे योग्य कार्य होण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. माणूस एक दिवस अन्नाशिवाय राहू शकतो, पण पाण्याशिवाय नाही. म्हणूनच, पाणी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि त्यासंबंधीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दिवसात किती पाणी प्यावे हे व्यक्तीच्या वजन, उंची आणि तब्येतीवर अवलंबून असते. दररोज सुमारे २ ते ३ लिटर पाणी आपल्या शरीरातून लघवी, घाम आणि मलावाटे बाहेर पडते.
News18
News18
advertisement

जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य नाही

आरोग्य तज्ञांच्या मते, जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे पचन प्रक्रियेत बदल घडवते. यामुळे परत परत भूक लागते आणि जास्त खाणे सुरू होते, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. याशिवाय पोटात सूज येणे आणि दुखणे अशा समस्या देखील होऊ शकतात. यामुळे शरीरात इंसुलिनची पातळी वाढू शकते, ज्याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांनी हे चुकूनही करू नये.

advertisement

जेवणाच्या ३० मिनिटं आधी पाणी पिणे फायदेशीर

लोकल १८ शी बोलताना नवसारीचे आयुर्वेदाचार्य डॉ. भार्गव यांनी सांगितले की, जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिल्याने पचनास मदत होते. असे केल्याने वजन कमी करण्यासही मदत होते. अर्धा तास आधी पाणी प्यायल्यास शरीरात म्युकस आणि गॅस्ट्रिक ज्यूसचे उत्पादन होते, ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभता येते आणि कमी कॅलरीचे सेवन होते.

advertisement

जास्त पाणी पिण्यामुळे होऊ शकते समस्या

जेवणाच्या आधी पाणी पिणारे लोक इतरांपेक्षा जलद गतीने वजन कमी करतात. थंड पाणी पिल्याने मेटाबॉलिज्म वाढतो, पण जास्त पाणी पिल्यास पोटातील आम्लाचे प्रमाण कमी होऊ शकते आणि प्रोटिन व इतर पोषकतत्त्व पचण्यास अडचण येऊ शकते. म्हणूनच पाणी पिण्याची वेळ आणि प्रमाण अत्यंत महत्त्वाचे आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : पाणी पिण्याचे योग्य नियम कोणते? जाणून घ्या, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल