प्रेम आणि तिरस्कार दोन्ही अनुभवता
बॉडी लँग्वेज तज्ज्ञ व्हेनेसा व्हॅन एडवर्ड्स यांच्या मते, "द्विधा मनस्थितीतील नातेसंबंध" पूर्णपणे सकारात्मक किंवा पूर्णपणे नकारात्मक नसतात, परंतु त्यात मिश्र भावनिक संकेत असतात, ज्यामुळे व्यक्ती सतत गोंधळलेल्या अवस्थेत राहते. अशा नात्यांमध्ये, एकाच वेळी प्रेम आणि तिरस्कार दोन्ही अनुभवता येतात. आणि म्हणूनच ते विषारी नात्यापेक्षा जास्त धोकादायक ठरते.
advertisement
मानसिक शांतता आणि आत्मविश्वास नष्ट होतो
खरं तर, द्विधा मनस्थितीतील नातेसंबंध आपल्यातील ऊर्जा काढून घेतात. ही नाती तुम्हाला या नात्यात राहायचं की नाही, हे ठरवू देत नाहीत. गोंधळाची ही स्थिती मानसिक ताण वाढण्याचे कारण बनते. अशा नात्यांचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे ते हळूहळू एखाद्या व्यक्तीची मानसिक शांतता आणि आत्मविश्वास नष्ट करतात. समजा, तुमचा एखाद्या मित्राला भेटण्याचा प्लॅन आहे आणि तुम्हाला ते पुढे ढकलावेसे वाटते, पण तरीही तुम्ही त्याला भेटायला जाता कारण तुम्ही खूप काळापासून मित्र आहात, तर हे द्विधा मनस्थितीतील नातेसंबंध असू शकतात. त्याला भेटून परत आल्यावर, तुमच्यात काय खास संभाषण झाले, हे तुम्हाला आठवतही नाही.
...असं नातं संपवणं सोईचं
खरं तर, द्विधा मनस्थितीतील नातेसंबंधांचा तुमच्या भावनिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. ही नाती एखाद्या व्यक्तीची ऊर्जा काढून घेतात आणि कधीकधी विषारी नात्यांपेक्षा जास्त हानिकारक ठरतात. अशी नाती एखाद्या व्यक्तीमध्ये सतत आत्म-शंका, असुरक्षितता आणि मानसिक थकवा निर्माण करतात. तज्ञांचा असा विश्वास आहे की, योग्य नात्यांसाठी जागा तयार करण्यासाठी आपण अशी नाती शक्य तितक्या लवकर संपवणे आवश्यक आहे. जर तुम्हीही अशा नात्यात असाल, जे तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमकुवत करत असेल, तर तुमच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे आणि योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
हे ही वाचा : Health Tips : पोटाची चरबी कमी करण्यासाठी सोप्या टिप्स, दिवसभरातल्या या सवयी ठरतील फायदेशीर
हे ही वाचा : प्रेम हेच वेदनेवरचं रामबाण औषध, दीर्घायुष्य हवं असेल, तर जोडीदाराची साथ महत्त्वाची! संशोधन सांगत की...
