उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच खूप थकवा जाणवू शकतो. या ऋतूत, कोणतंही काम न करताही आपल्याला अनेकदा खूप थकवा जाणवतो, याचं कारण समजून घेऊया.
हवामानातील बदलाचे परिणाम आपल्या शरीरावरही दिसतात. बाहेरचं तापमान वाढतं, तेव्हा शरीराचं तापमान सामान्य राखण्यासाठी आपल्या शरीराला अधिक मेहनत करावी लागते. शरीर थंड ठेवण्याच्या प्रक्रियेला थर्मोरेग्युलेशन म्हणतात, यात खूप ऊर्जा खर्च होते.
advertisement
याव्यतिरिक्त, उन्हाळ्यात आपल्याला जास्त घाम येतो, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. आपण पुरेसं पाणी प्यायलो नाही, तर या पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्याला दिवसभर थकवा आणि निरुत्साह जाणवू शकतो. यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते.
काही दिवसांसाठी अचानक वाढलेली थंडी किंवा ढगाळ हवामानाचा आपल्या शरीरावर आणि मनावरही परिणाम होतो. पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही, तेव्हा आपल्या शरीरातील सेरोटोनिन नावाच्या रसायनाची पातळी कमी होते.
या रसायनामुळे, आपली मनःस्थिती चांगली आणि सक्रिय राहते. याची पातळी कमी होते, तेव्हा कोणतंही कारण नसताना उदास, सुस्त वाटतं आणि काहीवेळा चिडचिडही होते. आजकाल हवेतील आर्द्रता हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. दमट दिवसांमधे, घाम सहज सुकत नाही, ज्यामुळे आपलं शरीर थंड होऊ शकत नाही.
यामुळे सतत जडपणा आणि थकवा जाणवतो. दुसरीकडे, जास्त कोरड्या हवेमुळे आपल्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरही आपल्याला ताजंतवानं वाटत नाही. याव्यतिरिक्त, हवेच्या दाबातील बदलांमुळे ऑक्सिजनच्या पातळीवरही परिणाम होतो. यामुळे काहींना श्वास घेण्यास थोडा त्रास किंवा अस्वस्थता जाणवू शकते, ज्यामुळे थकवा आणखी वाढतो.
ज्यांना आधीपासूनच रक्तदाब, श्वसन, हृदयरोग किंवा थायरॉईडच्या समस्या आहेत, त्यांना या हवामानातील बदलांचा अधिक त्रास होऊ शकतो. हवामानाचे परिणाम टाळण्यासाठी आणि स्वतःला उत्साही ठेवण्यासाठी, या सोप्या सूचना उपयोगी ठरु शकतात.
दिवसभर पुरेसं पाणी प्या.
झोपेची नियमित वेळ पाळा.
जड पदार्थांऐवजी पौष्टिक आणि सहज पचणारं जेवण घ्या.
दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणं टाळा.
