TRENDING:

Mahabharat : आईच्या गर्भातच चक्रव्यूहचं ज्ञान, तरी त्यात कसा अडकला अभिमन्यू?

Last Updated:

Mahabharat Story : महाभारताच्या युद्धात कौरव सेनापती द्रोणाचार्य यांनी पांडवांना पराभूत करण्यासाठी चक्रव्यूह नावाची एक विशेष युद्ध रचना तयार केली. अर्जुनचा मुलगा अभिमन्यूने ही कला त्याच्या आईच्या गर्भात शिकली, तरी तो या चक्रव्यूहात अडकला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : कुरुक्षेत्राच्या मैदानात महाभारताचे युद्ध शिगेला पोहोचलं होतं. कौरव आणि पांडवांचं सैन्य समोरासमोर होतं आणि दररोज नवीन सामरिक युद्ध कौशल्यं प्रदर्शित होत होती. तेराव्या दिवशी, कौरव सेनापती द्रोणाचार्य यांनी पांडवांना पराभूत करण्यासाठी चक्रव्यूह नावाची एक विशेष युद्ध रचना तयार केली. या रचनेत प्रवेश करणं सोपं होतं, पण त्यातून बाहेर पडणं अत्यंत कठीण होतं. अर्जुनचा मुलगा अभिमन्यूने ही कला त्याच्या आईच्या गर्भात शिकली, तरी तो या चक्रव्यूहात अडकला.
News18
News18
advertisement

चक्रव्यूह असं स्वरूप होतं ज्यामध्ये प्रवेश करणं सोपं होतं पण त्यातून बाहेर पडणं खूप कठीण होतं. ही रचना तोडण्याची कला फक्त काही योद्ध्यांकडेच होती. ज्यात श्रीकृष्ण, अर्जुन, द्रोणाचार्य आणि प्रद्युम्न यांचा समावेश होता. पण आणखी एक योद्धा होता ज्याला या रहस्यमय रचनेबद्दल माहिती  होती, तो अभिमन्यू होता. अर्जुन आणि सुभद्रा यांचा मुलगा अभिमन्यू याने आईच्या गर्भात असतानाच चक्रव्यूहात प्रवेश करण्याची कला शिकली. तथापि, जेव्हा अर्जुन चक्रव्यूहातून बाहेर पडण्याबद्दल बोलत होता, तेव्हा सुभद्रा झोपी गेली आणि अभिमन्यू ते ज्ञान प्राप्त करू शकला नाही.

advertisement

Mahabharat : महाभारत काळात कुंतीला मिळालेला शाप, आजही कायम, भोगत आहेत सगळ्या महिला

युद्धाच्या तेराव्या दिवशी, जेव्हा पांडवांना चक्रव्यूहात अडकवण्याचं आव्हान आलं, तेव्हा अभिमन्यूने कोणताही संकोच न करता रचनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आपल्या शौर्याने आणि कौशल्याने त्याने चक्रव्यूहाचे सहा दरवाजे ओलांडले पण सातव्या दरवाज्यावर तो अडकला.

अभिमन्यू चक्रव्यूहातून का बाहेर पडू शकला नाही?

advertisement

कौरवांनी युद्धाच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अभिमन्यूला सर्व बाजूंनी घेरलं. द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन आणि इतर कौरव योद्ध्यांनी मिळून अभिमन्यूवर हल्ला केला. अभिमन्यूने 16 वर्षे एकट्याने त्यांच्याशी लढा दिला पण शेवटी त्याला शहीद व्हावं लागलं.

Chanakya Niti : 2 गोष्टींना घाबरलात तर सगळं संपलं, ती भीती आजच सोडून द्या नाहीतर पस्तावाल

advertisement

अभिमन्यूचा मृत्यू ही एक दुःखद घटना होती पण त्याचं शौर्य आणि धाडस आजही लक्षात ठेवलं जातं. वय महत्त्वाचं नसतं. मनात धाडस आणि दृढनिश्चय असेल तर कोणत्याही अडचणीला तोंड देता येतं हे त्याने सिद्ध केलं.

अभिमन्यूची कहाणी आपल्याला काय शिकवते?

कधीही हार मानू नका : अभिमन्यूने प्रतिकूल परिस्थितीतही हार मानली नाही आणि धैर्याने लढला.

advertisement

ज्ञानाचं महत्त्व : अभिमन्यूने त्याच्या आईच्या गर्भातच ज्ञान मिळवलं. जे दर्शवते की ज्ञान कोणत्याही स्वरूपात आणि कधीही मिळवता येते.

धैर्य आणि आत्मविश्वास : अभिमन्यूने आत्मविश्वासाचं प्रतीक असलेल्या चक्रव्यूहात प्रवेश करून धैर्य दाखवलं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mahabharat : आईच्या गर्भातच चक्रव्यूहचं ज्ञान, तरी त्यात कसा अडकला अभिमन्यू?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल