ग्रामीण पर्यटनाचं आदर्श मॉडेल
उदगीरपासून 8 किमी आत एका पायवाटेच्या भागात हे गाव होतं. मात्र या ठिकाणी दळणवळणाच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या.
म्हणून 12 वर्षांपूर्वी या गावकऱ्यांनी शाहूवाडी तालुक्यातील वारूळ गावाजवळ नवीन वसाहत म्हणून गोठणे हे गाव वसवलं. पण इथं शेती नव्हती, रोजगार नव्हता. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी 2024 साली ग्राम पर्यटन उपक्रम सुरू केला. आणि आज केवळ 18 घरांचं हे गाव ग्रामीण पर्यटनाचं आदर्श मॉडेल ठरतंय.
advertisement
Tata, Mahindra पेक्षा Tesla Car वेगळी कशी? असे फिचर्स तुम्ही कधी पाहिले नसतील, स्पेशल VIDEO
आज रोज 20 ते 25 पर्यटक इथं भेट देतात, तर शनिवार-रविवारी ही संख्या अधिकच असते. बाहेरच्या जिल्ह्यांतूनही लोक गावात फक्त फिरायला नाही, तर ग्राम संस्कृती अनुभवायला येतात.
ग्राम पर्यटनामुळे गावातल्या प्रत्येक घरात किमान एक व्यक्ती रोजगारात आहे. गावातल्या महिलांनी गोधडी शिवून, तर तरुणांनी गाई पालन, वस्तू विक्री, मार्गदर्शन यातून स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. गोधडी शिवणं, नाचणीचे लाडू, पारंपरिक अन्नपदार्थ , हस्तकला वस्तू – बाबूंच्या वस्तू , बैलगाडी सफर, गावभेट या सारख्या उपक्रमामुळे शहरी भागातून पर्यटक फक्त गाव पाहायला नाही तर गाव जगायला येतात. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत संपूर्ण उपक्रम पर्यटकांना खुला असतो.
पुरेशी शेतजमीन नसतानाही गावाचं स्वाभिमान टिकवणाऱ्या गोठणेनं ग्राम पर्यटनाच्या माध्यमातून स्वावलंबन या संकल्पनेला खरी दिशा दिली आहे.