नेमकं काय घडलं?
ट्रॅक्टरमध्ये प्रवास करणारे 15 जण हे मजूर असून ते नांदुरा तालुक्यातील वडी गावचे रहिवासी आहेत अशी माहिती आहे. ते ट्रॅक्टरमधून मुंबई - नागपूर महामार्गावरून प्रवास करत होते. रस्ता ओलांडताना ट्रॅक्टरला कंटेनरने जोरात धडक दिली आणि भीषण अपघात घडला. या घटनेनंतर आजुबाजूच्या परिसरातील लोक संतप्त झाले असून त्यांनी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको केला आहे.
advertisement
या घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील कारवाई सुरू आहे. अपघात करणाऱ्या चालकाला तत्काळ अटक करा अशी मागणी नागरिक करत आहेत.
2019 मध्येही घडली होती अशीच घटना
2019 साली मलकापूर-नांदुरा तालुक्यातील धानोरा फाट्याजवळ भीषण अपघात झाला होता. धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. या अपघात दोन जण ठार झाले होते. तेव्हा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मलकापूरहून नांदुराकडे दोन वाहने येत होती. दरम्यान, समोर जाणार्या वाहनाला मागील बाजूने जोरदार धडक दिली होती. या अपघातात एका वाहनाने अचानक पेट घेतला होता. अपघाताची भीषणता एवढी होती की, मागील वाहन सुद्धा जळून खाक झाले होते. या अपघाताने खामगाव ते मलकापूर मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.
