TRENDING:

Weather update: उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रावर कोल्ड वेवचं संकट, 13 जिल्ह्यांसाठी हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Last Updated:

मुंबईसह महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा येथे ऑरेंज अलर्ट, जळगाव, नाशिक, नागपूरसह जिल्ह्यांना यलो अलर्ट, थंडीचा कडाका कायम.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Weather update: मुंबईसह उपनगरात गारठा वाढला आहे. लोक बाहेर शेकोटी पेटवत आहेत. तर हुडी, स्वेटर घालून घराबाहेर पडत आहेत. मुंबईत पहाटे हुडहुडी भरवणारी थंडी वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात थंडीचा जोर प्रचंड वाढला असून अनेक भागांमध्ये कोल्ड वेवची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांना थंडीच्या लाटेसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातही थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
News18
News18
advertisement

महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, तसेच शेजारील पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये थंडीचा तीव्र परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. कडाक्याच्या थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात तापमान 5 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. तर विदर्भात 7-8 अंशांवर तापमान आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये शीत लहरीची स्थिती कायम राहील. याचा अर्थ राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान लक्षणीयरीत्या खाली घसरण्याची शक्यता आहे.

advertisement

जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, निफाड, अहिल्यानगर इथे तापमान 4 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे हाडं गोठवणारी थंडी वाढल्याने लोक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीत. उत्तरेकडील शीत लहर कायम असल्याने महाराष्ट्रातही थंडीची लाट कायम राहणार आहे. ला निनामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिना सर्वात जास्त थंडी राहणार आहे.

advertisement

७ दिवस कसा राहील तापमानाचा अंदाज

राज्यात थंडीची स्थिती असताना, आगामी दिवसांमध्ये तापमानात काही चढ-उतार पाहायला मिळतील. पुढचे 48 तास महाराष्ट्रातील किमान तापमानात कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही, म्हणजेच थंडीचा कडाका कायम राहील. त्यानंतर पुढील तीन दिवसांसाठी किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना थंडीपासून थोडा दिलासा मिळेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुळाची झाली भाव वाढ, केळी आणि आल्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

मागच्या २४ तासांत महाराष्ट्रातील विदर्भ भागात कोल्ड वेवची नोंद करण्यात आली. पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब या राज्यांमध्येही थंडीची लाट दिसून आली आहे. ही स्थिती मध्य भारत आणि उत्तर प्रायद्वीपीय भारतात १४ डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather update: उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रावर कोल्ड वेवचं संकट, 13 जिल्ह्यांसाठी हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल