कुटेवाड हे एक अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी ते मजुरीही करत होते. मात्र, शिक्षणाची आवड, जिद्द आणि सामान्यज्ञानाची सातत्याने केलेली तयारी याच्या जोरावर त्यांनी केबीसीच्या मंचावर आपले स्थान पक्के केले आणि देशभरातील लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले. कैलास यांनी शोदरम्यान अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे देत एकामागोमाग एक पातळी पार करत 50 लाख रुपयांपर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण पैठण तालुका आणि संभाजीनगर जिल्हा अभिमानित झाला आहे.
advertisement
मला हे 50 लाख रुपये मिळालेत याचा उपयोग मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहे मला क्रिकेटर व्हायचं होतं पण घरची परिस्थिती नसल्यामुळे मला ते होता नाही आलं तर मी माझ्या मुलांना क्रिकेटसाठी देखील शिक्षण देणार आहे आणि छोटासा व्यवसाय सुरू करावा अशी माझी इच्छा आहे तर या करता ही रक्कम नीट वापरणार आहे असं कैलाश यांनी सांगितलं आहे.
त्यांची पत्नी म्हणून मला खूप अभिमान आहे त्यांनी जे यश मिळवलाय त्यामुळे आमची परिस्थिती आज सुधारणार आहे आणि आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी या पैशांचा आम्ही उपयोग करणार आहोत आणि मला आज खूप आनंद होत आहे असं कैलास यांच्या पत्नींने सांगितलाय. कैलास कुटेवाड यांचं हे यश हे ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत असून, प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि मेहनत याच्या जोरावर काय साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
मोलमजुरी करणाऱ्या कैलास नावाच्या पठ्ठ्यानं केबीसीचं मैदान मारलं
लहानपणी शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या व आता मोलमजुरी करून उपजीविका भागवणाऱ्या पट्ट्याने केबीसीचा मैदान मारलं. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी मजूर कैलास रामभाऊ कुटेवाड असं केबीसी मध्ये 1 ते 14 प्रश्नांची अचूक उत्तर देऊन 50 लाख रुपये जिंकलेल्या तरुणाचं नाव आहे. कैलास हे पैठण तालुक्यातील बालानगर जवळ असलेल्या एका 600 जणांच्या वस्तीत राहतात. त्यांना दोन एकर कोरडवाहू शेती असून त्यावर आई-वडील पती पत्नी दोन मुले यांचा उदरनिर्वाह चालतो. यावर नाहीच वागलं तर कैलास हे मूलमजुरी करतात. लहानपणी शाळेत हुशार असताना देखील योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना पुढील शिक्षण घेता आलं नाही यामुळे त्यांच्या मनात याबाबत खंत होती. मात्र त्यांनी काहीतरी करण्याची इच्छा सोडली नाही. गेल्या पाच वर्षापासून ते केबीसी मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत अखेर सहाव्यांदा त्यांच्या प्रयत्नांना यश आला असून त्यांनी सहभागी होत 50 लाख रुपये जिंकले आहेत.