मोठा भाऊ हरपला,- एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहली श्रद्धांजली
अतिशय मनाला चटका लावणारी आजची दुर्दैवी घटना दादांच्या जाण्याने झालीय. कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल. अजित दादा गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते. अतिशय परखड आणि स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली पकड संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होते. रोखठोक बोलणारे असले तरी अतिशय मनाने ते निर्मळ होते याचा अनुभव मी घेतला आहे. मी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होते तेव्हा लाडकी बहीण योजना इतर योजना सुरू केल्या तेव्हा आर्थिक घडी आहे, आर्थिक तरतूद उत्कृष्टपणे त्यावेळी केली होती याचा अनुभव मला आहे. एकदा करायचं ठरवलं की ते करायचे, करतो बघतो पाहातो असं त्यांचं कधीही नसायचं, आम्ही टीम म्हणून काम केलं. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या आहेत. अजित दादा पहाटे लवकर काम करायचे. अतिशय महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपला. खर म्हणजे काल परवाच आमची एका कार्यक्रमात आमची भेट झाली. सरन्यायाधीश मुंबईत आले होते ते येण्यापूर्वी आमची भेट झाली. त्यावेळी आमच्या चर्चा गप्पा गोष्टी झाल्या. आज जेव्हा मला बातमी कळली तेव्हा परवाच्या भेटीची आठवण पटकन डोळ्यासमोर आली. माझ्यापेक्षा ते राजकारणातील अनुभवती नेते, राजकारण, वयाने सगळ्याच बाबतीत मोठे होते. राजकारणातील अनेक विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्याचा फायदा मंत्रिमंडळात व्हायचा. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबियांचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं न भरुन येणारं नुकसान झालं आहे. माझ्या पेक्षा वयानं मोठे असल्यामुळे जे काही आमची जवळीक निर्माण झाली होती राजकारणातले आम्ही एक टीम म्हणून काम करत असलो तरीसुद्धा एक मोठा भाऊ म्हणून माझ्यासाठी होते. मोठा भाऊ हरपल्याची भावना त्याचं दु:ख माझ्या मनात आहे. मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. उपमुख्यमंत्री शिंदेंचे शब्द बोलताना अडखळले, त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यांनी आवंढा गिळला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.