Car Tyre: उन्हाळ्यात असतो कारचे टायर फुटण्याचा धोका! जीवावरही बेतू शकतं, अशी घ्या काळजी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
उन्हाळा सुरू झाला आहे. भारतीय रस्यांवर कारचे टायर फुटण्याची समस्या निर्माण होते. आज आपण असं होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे पाहणार आहोत.
उन्हाळा सुरू झाला की, भारतीय रस्ते हे प्रचंड तापतात. ज्यामुळे गाड्यांच्या टायरसंबंधित समस्या या सुरू होतात. अनेकदा टायर पंचर होणे किंवा फुटण्याच्या घटना समोर येतात. ज्यामुळे आपल्या जीवावरही बेतू शकतं. म्हणूनच हे टायर का फुटू शकतात आणि उन्हाळ्यात टायरची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अन्यथा हे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतं.
advertisement
उन्हाळ्यात टायरला प्रॉब्लम का येते? : भारतातील अनेक भागांमध्ये उन्हाळ्यात तापमान हे 40 डिग्री सेल्सियसहून वर जाते. रस्ते हे जास्त गरम होतात. कार सतत अशाच रस्त्यांवरुन जात असतात तेव्हा टायरमध्ये उष्णता जमा होऊ लागते.यामुळे हवेता दबाव वाढतो आणि रबर नरम आणि कमकुवत होते. टायरचा भाग आधीच घासलेला असेल तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. ज्यामुळे टायर फेल होण्याचा धोका वाढतो.
advertisement
टायरमध्ये चुकीचं प्रेशर किती धोकादायक? : टायर फुटण्यामागचं सर्वात सामान्य कारण म्हणजे, चुकीचं एयर प्रेशर. अनेक ड्रायव्हर नकळत टायरमध्ये गरजेपेक्षा जास्त हवा किंवा कमी हवा भरून गाडी चालवतात.जास्त हवा भरलेल्या टारमध्ये उष्णता जास्त संवेदनशील होते. तापमान वाढल्यावर टायरच्या आत हवा पसरते आणि दबाव वाढतो. ज्यामुळे अचानक टायर फुटू शकते.तसंच कमी हवेचे टायर जास्त खाली बसतात, ज्यामुळे अतिरिक्त उष्णता निर्माण होते. काही काळानी यामुळे टायरची संरचना कमकुवत होते.
advertisement
advertisement
जुन्या टायरमध्ये उष्णता का पसरते? : अनेकदा टायर बाहेरुन चांगले दिसतात. मात्र त्याचे रबर हे खराब झालेले असता. भारतात पाच-सहा वर्षे जुन्या टायर्सवर गाडी चालवणे सामान्य आहे. अशा उष्ण वातावरणात टायर सहज फेल होऊ शकतात.साइडवॉलवर लहान क्रॅक, फुगवटा किंवा असामान्य घासलेले दिसले तर दुर्लक्ष करू नका. हे टायर फेल होण्याचे सुरुवातीचे लक्षणं असू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









