बाप-लेकाच्या जोडीची कमाल! रस्त्याच्या कडेला सुरू केला भन्नाट व्यवसाय, आता दिवसाला करताय २७ लाखांची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रमाणिकपणे काम करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. यश नक्की मिळत असते. आज आपण अशीच एक यशोगाथा जाणून घेणार आहोत.
मुंबई : प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रमाणिकपणे काम करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. यश नक्की मिळत असते. आज आपण अशीच एक यशोगाथा जाणून घेणार आहोत. वडील आणि मुलाने मिळून आपल्या व्यवसायात मोठं नाव कमवलं आहे. आणि संपूर्ण देशभरात त्यांची चर्चा आहे.
एक ढाबा बनला १०० कोटींचा साम्राज्य
हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील मुरथल हे एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे. या परिसराची ओळख निर्माण करण्यात अमरिक सुखदेव ढाब्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोणत्याही जाहिरातीशिवाय, हा ढाबा १०० कोटी रुपयांचे साम्राज्य बनला आहे. याचे मालक अमरिक सिंग आणि सुखदेव सिंग आहेत. याची स्थापना १९५६ मध्ये अमरिक आणि सुखदेव यांचे वडील, सरदार प्रकाश सिंग यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या तंबूत केली होती. १९९० च्या दशकात त्यांचे पुत्र, अमरिक आणि सुखदेव यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर, या ढाब्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. "मुरथलचे पराठे" हे अमरिक सुखदेव यांचे नाव बनले. दिल्ली-एनसीआरसह दूरदूरवरून लोक येथे जेवायला येतात. आणि यांची एक दिवसाची कमाई २७ लाख रुपये आहे.
advertisement
ढाब्याची सुरुवात १९५६ मध्ये झाली
सरदार प्रकाश सिंग यांनी १९५६ मध्ये हा ढाबा सुरू केला आणि आपले मुलगे अमरिक व सुखदेव यांची नावे ठेवली. सुरुवातीला, येथे प्रामुख्याने ट्रक ड्रायव्हर्सना सेवा दिली जात असे. तथापि, हळूहळू येथील स्वादिष्ट तंदुरी पराठ्यांमुळे, विशेषतः पांढऱ्या लोण्यासोबत मिळणाऱ्या पराठ्यांमुळे, याला लोकप्रियता मिळाली. हा इतका लोकप्रिय झाला की दिल्ली-चंदीगड मार्गावरून प्रवास करणाऱ्या कुटुंबांमध्ये आणि पर्यटकांमध्ये तो एक आवडता ढाबा बनला.
advertisement
मुलांनी केला कायापालट
१९९० च्या दशकात, सरदार प्रकाश सिंग यांचे मूलं अमरिक आणि सुखदेव यांनी हा ढाबा ताब्यात घेतला. त्यानंतर याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी या साध्या जागेचे एका आधुनिक रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केले. एकेकाळी ट्रक ड्रायव्हर्ससाठी असलेला हा रस्त्याच्या कडेचा ढाबा आता 'अमरिक सुखदेव रेस्टॉरंट' बनला आहे.
महिन्याला ८ कोटींची कमाई
सीएनबीसी-टीव्ही१८ च्या एका अहवालानुसार, तुम्ही या ढाब्याला कधीही भेट दिल्यास, १५० हून अधिक टेबलांवर किमान ६०० लोक जेवत असतात. प्रत्येक टेबलसाठी अंदाजे ४५ मिनिटांचा वेळ लागतो आणि दिवसातून १५ वेळा टेबल रिकामे होऊन पुन्हा भरले जातात असे गृहीत धरल्यास, हे रेस्टॉरंट दररोज अंदाजे ९,००० लोकांना सेवा देते. प्रत्येक ग्राहक सरासरी ३०० रुपयांपेक्षा जास्त खर्च करतो. याचा अर्थ असा की, हे रेस्टॉरंट कोणत्याही दिवशी २७ लाख रुपये कमावते. यावरून मासिक उत्पन्न अंदाजे ८ कोटी रुपये होतो आणि वार्षिक उत्पन्न १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असतो.
advertisement
बस आणि कॅब चालकांना मोफत जेवण
अम्रिक आणि सुखदेव यांनी ट्रक, बस आणि कॅब चालकांना सवलतीत आणि मोफत जेवण देण्याची प्रथा सुरू केली. यामुळे ते त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये थांबण्यास प्रोत्साहित झाले. त्यांनी जेवणाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता त्यांच्यामध्ये आपली प्रतिष्ठाही जपली. यामुळे केवळ नवीन ग्राहकच आकर्षित झाले नाहीत, तर पहिल्यांदा येणारे ग्राहकही नियमित ग्राहक बनले. तसेच जेवणाचा दर्जा केवळ उत्कृष्टच नव्हे, तर त्याची चवही कायम चांगली राहील याची ते पूर्ण काळजी घेतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 7:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बाप-लेकाच्या जोडीची कमाल! रस्त्याच्या कडेला सुरू केला भन्नाट व्यवसाय, आता दिवसाला करताय २७ लाखांची कमाई








