खरं तर वारकरी संप्रदायामध्ये आदिनाथ महाराज यांचा मोठा अधिकार आहे. बीड जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेल्या तारकेश्वर गड या ठिकाणी ते महंत म्हणून काम पाहतात. बीडच्या आष्टी तालुक्यातील महिंदा गावात तारकेश्वर गड अध्यात्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.
दरम्यान आज आदिनाथ महाराज यांनी आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास गडावरच सर्व भक्तांना खोलीच्या बाहेर ठेवलं आणि ते एकटे खोलीत गेले.त्यानंतर आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःच वार केले होते. या घटनेनंतर त्यांना अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होते.यावेळी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
advertisement
शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर
डॉक्टर हर्षवर्धन तनवर यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती.आता त्यांची प्रकृती स्थिर असून कोणतीही काळजी करण्याचे कारण नसून भक्तांनी महाराजांना आठ दिवस भेटणे टाळावं जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही असं आवाहन डॉक्टर तन्वर यांनी केलं आहे.
तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले व आमदार मोनिका राजळे हे रुग्णालयात दाखल झाले त्यांनी महाराजांच्या प्रकृतीची विचारपूस केली.महाराजांवर शस्त्रक्रिया झाली असून ती अत्यंत व्यवस्थित झाली असुन कोणत्याही अफवांवरती कोणीही विश्वास ठेवू नये असं आवाहन भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केली आहे.
आदिनाथ महाराज यांनी असे पाऊल का उचलले याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे. पण या घटनेने तारकेश्वर गडाच्या भाविक भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे.
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना मानणारा मोठा भक्त परीवार अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात आणि बीड जिल्ह्यात आहे. आदिनाथ महाराज यांनी हे पाऊल उचलल्यान त्यांच्या पाथर्डी आणि बीड जिल्ह्यातील भक्त परिवारात मोठी खळबळ उडाली आहे.
