TRENDING:

Girish Mahajan: महिला अधिकारी संतापली, अखेर भाषणाच्या वादावर गिरीश महाजनांकडून दिलगिरी, म्हणाले...

Last Updated:

महिला कर्मचाऱ्याने भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा थेट जाब विचारला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर अखेरीस गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही म्हणून एका वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा थेट जाब विचारला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर अखेरीस गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.  'डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अनवधानाने राहिलं असेल, असं काही नाही. पण, तसा कोणताही हेतू नव्हता' असं म्हणत महाजन याांनी दिलगिरी व्यक्त केली.
News18
News18
advertisement

७७ वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये भाजपचे नेते आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. गिरीश महाजनांनी यावेळी भाषण केलं. पण,  भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने एका महिला पोलिसांनी महाजनांना जाब विचारला होता. या प्रकरणी गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिलगिरी व्यक्त केली.

"डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अनवधानाने राहिलं असेल, असं काही नाही. पण, तसा कोणताही हेतू नव्हता. त्यावेळी  मी घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम् , छत्रपती शिवाजी महाराज की जय ते बरोबर होतं. पण, अनवधानाने झालं असेल पण नाव डावलणे असा कोणताही हेतू नव्हता. मुद्यामहून नावं डावलण्याचा हेतू नव्हता, हवी तर माझी भाषणं एकदा काढून पाहा, जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतोय' असं म्हणत महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली.

advertisement

नेमकं काय घडलं होतं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
फक्त 20 रुपयांत मेजवानी! मुंबईत इथं मिळतेय स्पेशल चायनीज भेळ; लोकांची तुफान गर्द
सर्व पहा

ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाषण केलं. पण, त्यांच्या भाषणावर वन विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेतला. "गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. जो व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे. मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी देणं घेणं नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन. माती काम करेन. पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं असेल तर करू शकता. बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. मी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या तारखांना मानत नाही. पण लोकशाही मानते. मॅडम तुम्ही देखील संविधानामुळे आहात. पालकमंत्री देखील संविधानामुळे आहेत." असं म्हणत जाधव यांनी रोखठोक भूमिका मांडली होती. माधवी जाधव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Girish Mahajan: महिला अधिकारी संतापली, अखेर भाषणाच्या वादावर गिरीश महाजनांकडून दिलगिरी, म्हणाले...
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल