विविध पक्षांचे नेते उमेदवारांच्या प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. मात्र, तीव्र स्पर्धेत एकमेकांवर टीका करताना अनेकांची भाषा खालावत असल्याची घटना वारंवार समोर येत आहे. काही ठिकाणी मत न दिल्यास निधी मिळणार नाही अशा उघड धमक्या देण्यापर्यंतही काही नेते उतरले आहेत. तर, आता थेट फडकून टाकण्याची भाषा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.
advertisement
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण केला आहे. विरोधकांवर निशाणा साधताना म्हणाले की, “हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. ते गृहमंत्री आहेत. ते नागपूरचे आहेत. त्यामुळे जास्त वळवळ कराल तर कापून काढू. देशमुखांनी विरोधकांना उद्देशून दिलेल्या या थेट धमकीने एकच खळबळ उडाली आहे. विशेषत: यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते.
भाजपचा प्रचार करतो म्हणून झाली होती मारहाण...
काही दिवसांपूर्वीच भाजपचा प्रचार करतो का असा सवाल करत काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. त्यावरून कळमेश्वरमधील वातावरण तापलं होतं.
