बुलढाणा जिल्ह्यातील सुरुवातीला तीन गावामध्ये टक्कल पडण्याची घटना घडली होती. त्यावेळी 30 रुग्णांना टक्कल पडल्याची बाब समोर आली होती. मात्र आता टक्कल पडत असल्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 24 तासाच्या आता टक्कल पडलेल्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याचं समोर आलं असून आता टक्कर पडणाऱ्याची संख्या 30 वरून थेट 100 वर पोहचली आहे. 11 गावांमध्ये तेथील ग्रामस्थांना केस गळती होत टक्कल पडत आहे त्यामुळे जिल्ह्यातील पुन्हा खळबळ माजली आहे
advertisement
टक्कल पडण्याचे कारण काय?
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावातील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालंय. गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरतंय. खारबाण पट्ट्यातील या गावात पिण्याची पाण्याची वेगळी सोय केलेली आहे मात्र वापरण्याच्या पाण्यात नाइट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचं धक्कादायक वात्सव समोर आल आहे.
गावकरी भयभीत
या आजाराने गावात शिरकाव केल्याने गावकरी चांगलेच भयभीत झाले आहेत. आरोग्य विभागाच्या टीम या गावात दाखल झाले असून सर्वेक्षण देखील सुरू केले
