TRENDING:

ज्यांनी मराठा समाजाचा गळा घोटला आता तेच..; आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Last Updated:

आज बुलढाण्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलढाणा, 3 सप्टेंबर, उदय तिमांडे : आज बुलढाण्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील घटनेवर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जालन्यामध्ये जी घटना झाली त्याचं मला देखील दु:ख आहे. मात्र या घटनेची कारणमीमांसा न करताच आरोप केले जात आहेत. ज्यांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते तिथे येऊन गेले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
News18
News18
advertisement

नेमकं काय म्हणाले शिंदे? 

मराठा आरक्षणावरून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जालन्यामध्ये जी घटना झाली त्याचं मला देखील दु:ख आहे. मात्र या घटनेची कारणमीमांसा न करताच आरोप केले जात आहेत. ज्यांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते तिथे येऊन गेले. आज या विषयावर राजकारण सुरू आहे. मात्र मराठा समाज संयमी आहे. आंदोलनाच्या मागून कोण दगडफेक करत आहे ते पाहावं लागणार आहे. याची माहिती आमच्याकडे येत आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे,  भक्कम आरक्षण मिळेपर्यंत सरकार आणि मी गप्प बसणार नाही. तो दिवस दूर नाही लवकरच मराठा समाजाला न्याय मिळेल. जालन्यातील लाठीचार्ज दुर्दैवी घटना आहे. जे अधिकारी दोषी असतील त्यांचं निलंबन केलं जाईल, गरज पडल्यास प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईलं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
ज्यांनी मराठा समाजाचा गळा घोटला आता तेच..; आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल