शेतकऱ्याचा उद्रेक
पावसाच्या लहरीपणाचा फटका यंदा सोयाबीन पिकाला सर्वाधिक बसला. त्यातच पीक ऐन भरात असताना येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. किमान भाव तरी समाधानकारक मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पाच हजारांचा पल्लाही गाठत नसल्यामुळे लागवडही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किमान सहा हजार रुपये तरी भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. सोयाबीनला भाव मिळत नसल्याने खामगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर एका शेतकऱ्याने हातात कोयता व देशी कट्टा सदृश्य वस्तू हातात घेऊन निदर्शने केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. 6 हजार रुपये सोयाबीनला भाव द्या, अश्या घोषणा देत त्या शेतकऱ्याने APMC समोर तांडव केला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शेतकऱ्याच्या या कृत्याने खळबळ माजली आहे.
advertisement
वाचा - NCP : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण, सुनावणीचे वेळापत्रक तयार; कसे असेल कामकाज?
तेल आणि सोयाबीन ढेप आयात, दरांवर परिणाम
मागच्या वर्षी सोयाबीनला 6 हजार रुपये क्विंटलपर्यंतचा भाव होता. यावर्षी सुरुवातीलाच 3800 रुपये क्विंटलचा भाव मिळत होता. यामुळे सोयाबीनची सोंगणी करायची की नाही, असा प्रश्नही शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने सोयाबीन तेल आणि डीओसी आयात करण्याचे धोरण जाहीर केले आहे. तेल आणि सोयाबीन ढेप आयात होत असल्याने बाजारात सोयाबीनचे दर पडले आहेत. पुढील काळात हे दर काय असतील हे सांगणे सध्या तरी अवघड आहे.
