बुलढाणा, 8 ऑगस्ट : शेतकऱ्यांसाठी काम करणारी संघटना अशी ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी स्वाभिमानीच्या शिस्तपालन समितीने बैठक बोलावली होती. या बैठकीला रविकांत तुपकर यांनी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, तुपकर अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.
advertisement
काय म्हणाले रविकांत तुपकर?
स्वाभिमानी शेतकरी संघटना मध्ये संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते मिटावे यासाठी पुण्यात शिस्तपालन समितीने बैठक घेतली होती. त्यात तुपकर गैरहजर होते त्या नंतर शिस्त पालन समितीने पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा रविकांत तुपकर यांना 15 ऑगस्ट पर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिला आहे. मात्र, तुपकर यांनी आपलं म्हणणं अगोदरच मांडले असल्याचं बोलत पुन्हा एकदा शिस्त पालन समितीला आव्हान दिलं आहे.
तुपकरांना मिळणार आणखी एक संधी
पक्षात अंतर्गत कलह निर्माण झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेन्या शिस्तपालन समितीने पुण्यात बैठक बोलावली होती. रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी वादावर समिती आपला निर्णय जाहीर करणार आहे. तुपकरांना आणखी एक वेळ संधी दिली जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. तुपकरांना आपलं मत शिस्त पालन समितीकडे मांडावे. समितीकडून अजूनही टोकाची भूमिका घेतल्या जाणार नाही. राजू शेट्टी आणि तुपकर वाद मिटविण्यासाठी आणखी एक संधी देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
वाचा - भाजपने देशात 9 वर्षात 9 सरकारे पाडली, महाराष्ट्रात दोनदा; सुप्रिया सुळेंचा लोकसभेत हल्लाबोल
राजू शेट्टी यांचा भाजपवर आरोप
पक्ष आणि संघटना फोडण्याचं भाजपचं अधिकृत काम आहे. मागच्या काही दिवसांपासून आपल्याला राज्यात ते दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जे घडतंय यामागे सुद्धा भाजप असल्याचा संशय आहे, असं राजू शेट्टी म्हणालेत. भाजपकडून ऑफर दिली जाते, निश्चितच संशयाला जागा आहे. याआधी शिवसेना, राष्ट्रवादी आणि याआधीही शेतकरी संघटनेत जे झालं आहे. त्यामुळे आताही जे घडतंय. त्यामागे भाजप असण्याची शक्यता आहे, असं राजू शेट्टी म्हणालेत. आजच्या बैठकीला रविकांत तुपकर यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. बैठकीसमोर येऊन तुपकरांनी आपलं म्हणणं मांडावं, असंही ते म्हणालेत.
