सुरुवातीला फंगल इन्फेक्शन किंवा पाण्यामुळे केस गळती होत असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. पुढे बुलढाण्यातील लोणार सरोवरातील पाणी पिण्याच्या पाण्यात झिरपल्याने हा प्रकार घडत असावा, अशा शक्यताही बांधण्यात आल्या. मात्र अजूनही या गावातील लोकांचं टक्कल कशामुळे पडत आहे, याचं निदान करता आलं नाही. केसगळती होत असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील अनेकांनी अंघोळ करणं देखील बंद केलं आहे. तरीही प्रशासनाकडून अद्याप ठोस पावलं उचलल्याच दिसत आहे.
advertisement
या घटनेला जवळपास 15 दिवस उलटल्यानंतर आता अखेर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडीकल सायन्सेस अर्थात ICMR चं पथक बुलढाण्यात दाखल होणार आहे. दुपारी १२ वाजण्याच्या आसपास चेन्नई आणि दिल्ली ICMR चं पथक बुलढाण्यात येणार आहे. इथं येऊन ते पाण्याचे नमुने घेणार आहेत, शिवाय इथल्या लोकांची केसगळती नेमकी कशामुळे होतेय, या कारणाचा शोध घेणार आहेत. ICMR च्या तपासानंतर केसगळतीचं खरं कारण समोर येण्याची शक्यता वर्तवली जातेय.
पण या टक्कल व्हायरसची साथ आता आसपासच्या गावात पसरत आहे. हे नेमकं कशामुळे होतंय, हेच इथल्या नागरिकांना माहीत नसल्याने ही साथ रोखण्यासाठी काय काळजी घ्यायची, हेच इथल्या लोकांना माहीत नाही. सुरुवातीला डोक्याला खाज सुटणे आणि नंतर तीन दिवसातच केस गळून टक्कल पडत असल्याने येथील लोक दहशतीखाली जगत आहेत.
