नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
शासन आपल्या दारी कार्यक्रमाला नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत गर्दी आहे. लोकांशी संवाद साधण्यासाठी मी इथे आज आलो आहे. आजचा 15 वा कार्यक्रम असून आजपर्यंत 1 कोटी 61 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस हे लेह लडाखमध्ये भारतीय सैनिकांच्या कार्यक्रमाला गेले आहेत. तर अजित पवार यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर आहेत असं काही नाही. आमच्यात फेविकॉलचा मजबूत जोड आहे. सरकारला कुठेही काही अडचण नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी जालन्यातील लाठीचार्जवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावर बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. जालन्यामध्ये जी घटना झाली त्याचं मला देखील दु: ख झालं आहे. मात्र त्याची कारणमीमांसा न करता आरोप करण्यात येत आहेत. ज्यांनी मराठा समजाचा गळा घोटला तेच तिथे येऊन गेले. आंदोलनाच्या मागून दगड फेक कोण करतात हे पाहावं लागेल याची माहिती आमच्या कडे येत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
