माने दांपत्य हे नंदनवन कॉलनीत वास्तव्यास होते. त्यांचे पडेगावच्या देशमुखनगर येथेही निवासस्थान होते. काही दिवसांपूर्वी निधन झालेल्या आर्चआंगण येथील नातेवाइकांच्या घरी भेटीस गेले होते. संध्याकाळी ते पडेगावहून आपल्या देशमुखनगर येथील निवासस्थानाकडे परतत होते. रस्ता ओलांडताना नगर नाक्याकडून येणाऱ्या पांढऱ्या कारने दोघांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दाम्पत्य काही मीटर दूर फेकले गेले. स्थानिकांनी तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दोघांचे पार्थिव रविवारी मूळगाव रुईभर (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे नेण्यात येणार असून, सायं. 4.30 वाजता अंतिम संस्कार होतील.
advertisement
अल्लड प्रेमाचा तुरुंगात शेवट, दीड वर्षांनी बहिणीला फोन केला अन् प्रियकर फसला, आता प्रेयसी म्हणते...
अनेक विद्यार्थ्यांना अपत्याप्रमाणे जपले
अॅड. रत्नमाला माने यांनी तीन दशकांहून अधिक काळ हायकोर्टात वकिली करत न्यायव्यवस्थेत आपला ठसा उमटवला. प्रामाणिकपणा, सामाजिक जाण आणि समर्पणभावनेमुळे त्या वकील म्हणून नव्हे तर एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जायच्या. दाम्पत्याला अपत्य नव्हते, मात्र त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे जपले.
मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक
डॉ. रामराव माने हे मूळ रुईभर (धाराशिव) येथील होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 1980 ते 2024 या कालावधीत रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्य केले. अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक शैक्षणिक निर्णयांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्राच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार आणि प्रयत्न निर्णायक ठरला.
संशोधन क्षेत्रात योगदान
संशोधन क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय होते. त्यांच्या नावावर अनेक पेटंट नोंदवले गेले असून, राज्यस्तरीय शैक्षणिक धोरण समितीवर त्यांनी मोलाचे काम केले. अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक आधार देण्याचे काम डॉ. माने यांनी केले. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेले अनेक विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये कार्यरत आहेत. गरजू विद्यार्थ्यांसाठी ते स्वतःहून शिष्यवृत्ती देत, तर परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्यांना आर्थिक हातभार लावत.






