राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी दुपारी १ वाजता संपन्न झाली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले.
कॅबिनेट बैठकीदिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
१) आस्तिक कुमार पांडे (IAS:RR:२०११) आयुक्त, कर्मचारी राज्य विमा योजना, मुंबई यांना सहआयुक्त, MMRDA, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
advertisement
२) आर.एस. चव्हाण (IAS:SCS:२०१३) यांची मुंबई येथील कर्मचारी राज्य विमा योजना आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३)राहुल गुप्ता (IAS:RR:2017) सह व्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर यांची हिंगोली जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४) सत्यम गांधी (IAS:RR:2021) प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची महापालिका आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५) विशाल खत्री (IAS:RR:2022) सहायक जिल्हाधिकारी, राळेगाव उपविभाग, यवतमाळ यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
