TRENDING:

Devendra Fadnavis Ajit Pawar: CM फडणवीस–अजित पवारांमध्ये रात्री खलबतं, कोकाटेंच्या राजीनाम्यानंतरच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Last Updated:

Ajit Pawar Meet CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांच्यात रात्री उशिरा खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांच्यात रात्री उशिरा खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे.
CM फडणवीस-अजित पवारांमध्ये रात्री खलबतं, कोकाटेंच्या राजीनाम्यानंतरच्या बैठकीत काय झालं?
CM फडणवीस-अजित पवारांमध्ये रात्री खलबतं, कोकाटेंच्या राजीनाम्यानंतरच्या बैठकीत काय झालं?
advertisement

राज्यातील सत्ताधारी महायुतीतील हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल रात्री पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिका निवडणुकीबाबत काय झाली चर्चा?

advertisement

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अमरावती महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची भूमिका या बैठकीत स्पष्टपणे मांडली. मात्र, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीत सहभागी होण्याची तयारी असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळवले असल्याची माहिती आहे.

मुंबईतील जागा वाटपाच्या चर्चेत भाजपने नवाब मलिक यांना विरोध केला आहे. राष्ट्रवादीकडून मुंबईतील पक्षाची धुरा ही नवाब मलिकांकडे सोपवण्यात आली आहे. मात्र, भाजपने मलिकांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळासोबत जागा वाटपाची चर्चा करणार नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते. तर, राष्ट्रवादी मलिकांच्या नेतृत्वावर ठाम राहिले. या मुद्यावरही फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत मध्यममार्ग काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

advertisement

मुंबईतील जागावाटपाबाबत चर्चा करताना अजित पवार यांनी नवाब मलिक यांना चर्चेपासून दूर ठेवत, स्वतंत्र छोट्या गटामार्फत जागावाटपाच्या वाटाघाटी करता येतील, असा पर्याय सूचवला असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येते. या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मकर संक्रांत आधीच वाढले गुळाचे दर, क्विंटलमागे एवढ्या रुपयांची वाढ,कारण काय?
सर्व पहा

याच बैठकीत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या खात्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. पुढे हे महत्त्वाचे खाते कुणाकडे द्यावे, यावर प्राथमिक पातळीवर विचारविनिमय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis Ajit Pawar: CM फडणवीस–अजित पवारांमध्ये रात्री खलबतं, कोकाटेंच्या राजीनाम्यानंतरच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल