शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील उपशाखाप्रमुखांचा मेळावा सोमवारी पार पडला. त्यावेळी मतदार यादीतील घोळ, संशयास्पद मतदारांबाबत आदित्य ठाकरे यांनी सादरीकरण केले. यावेळी त्यांनी वरळी मतदारसंघातील काही मतदार याद्यांमध्ये असलेल्या घोळाबाबत भाष्य केले.
आज कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयांची माहिती दिली. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांनी राज्याचे पप्पू बनू नये अशी अपेक्षा आहे.
advertisement
राहुल गांधी प्रमाणे त्यांनी स्क्रिन लावून आरोप केले. मात्र, त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. निवडणूक आयोगानेही या आक्षेपांने उत्तर दिली आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी असा प्रकार करू नये असे फडणवीस यांनी म्हटले.