वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारत ते दुसऱ्याच दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. मैनाक घोष असं संबंधित अधिकाऱ्याचं नाव आहे. ते धाराशिव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
वडिलांचे अवघ्या एका दिवसापूर्वी निधन झाले. अंत्यविधी उरकून दुसऱ्याच दिवशी पूरग्रस्तांची मदत आणि सरकारी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ मैनाक घोष हे फिल्डवर उतरून पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देत आहेत. एवढेच नाही तर ते प्रशासनाच्या उपाययोजना देखील करत आहेत. वडिलांच्या अंत्यविधीनंतर त्यांना वडगाव सिद्धेश्वर येथील गावकऱ्यांनी पाझर तलावाची पातळी धोक्याची झाली असल्याची माहिती दिली.
advertisement
यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. आपल्या मनात वडील गेल्याचे दुःख दाबून ठेवत, त्यांनी प्रशासनाच्या कार्याला व गावकऱ्यांच्या सुरक्षेला महत्त्व दिल्याने मैनाक घोष यांच्या कर्तव्यदक्षपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.