या कारणांमुळे औषध दुकानांचे परवाने रद्द
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी औषध दुकानांची तपासणी सुरू होती. मागील 7 महिन्यांपासून सुरू असलेल्या या तपासणीत अनेक औषधांच्या दुकानांमध्ये गंभीर स्वरुपाच्या त्रुटी आढळल्या. त्यामुळे ही धडक कारवाई करण्यात आली आहे. बनावट आणि कालबाह्य औषधांची साठवणूक करणे, परवानाधारकांऐवजी इतर व्यक्तीकडून दुकान चालविणे, औषध खरेदी-विक्रीत तफावत असणे, बिले आणि इतर नोंदी न ठेवणे आणि दुकान बंद असतानाही माहिती न देणे, अशाप्रकारच्या विविध कारणांमुळे विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
advertisement
30 दिवसांच्या मुदतीनंतर केली कारवाई
जिल्ह्यातील औषध दुकानांवर कारवाई करण्यापूर्वी विभागाच्या सहायक आयुक्तांकडून संबंधित औषध दुकानांना नोटीस देण्यात आली होती. त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी 30 दिवसांची मुदतही देण्यात आली होती. त्यानंतर सुनावणी घेत औषध दुकानांचे परवाने रद्द आणि निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे इतर औषध दुकानांचे धाबे दणाणले आहेत.
संपूर्ण जिल्ह्यातील 35 औषध दुकानांवर कारवाई
संभाजीनगर, अंबाबाई मंदिर परिसर, शाहूपुरी, राजारामपुरी या परिसरातील तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यात असणाऱ्या 35 औषध दुकानांवर ही कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे की, औषधे खरेदी करताना बिल घ्यावे, औषधांची तारीख तपासावी, दुकानांत गैरप्रकार दिसल्यास त्याची माहिती विभागाला त्वरित कळवावी.
हे ही वाचा : शेतकरी कर्जमाफी कायमस्वरूपी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट सांगितलं
हे ही वाचा : Manoj Jarange Patil : आरक्षणासाठी मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकणार, मंत्रालयात हालचालींना वेग, समोर आली अपडेट...
