नेमकं घडलं काय?
अंबड तालुक्यातील एका गावातून फिरायला जायचे म्हणून नात्यातील मुलीला कारमधून सोबत नेले. यानंतर मुलीला आळंदी येथील एका मंदिरात नेण्यात आले. मुलीची इच्छा नसतानाही मुलीला 'लग्न कर, नसता तुला जिवंत मारून टाकू,' अशी धमकी देत बळजबरीने लग्न लावून घेतले. दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर मुलीने आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. यानंतर मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अंबड तालुक्यातील एका गावात घडली.
advertisement
पुणे हादरलं! सोन्याच्या दागिन्यांसाठीचा 'तो' हट्ट पडला महागात; पतीनं पत्नीला कायमचं संपवलं
या प्रकरणात मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून महेश राजेंद्र काकडे, सोनू राजेंद्र काकडे यांच्यासह दोन महिला अशा चार जणांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ज्ञानेश्वर कंटुले हे करीत आहेत.
दरम्यान, नातेवाईक मुलीला घेऊन गेल्याची माहिती कळाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी 'मुलीचा होकार असेल तर लग्न लावून देतो,' असे सांगितले. परंतु, त्याआधीच आळंदी येथे मुलीचा विवाह करून घेतला आहे. ही संपूर्ण घटना 21 जानेवारी रोजी घडली.
बसस्थानकातून मुलीला कारमध्ये बसवले
मुलगी ही गेवराई येथे कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. ती 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शहागड येथील बसस्थानकात आली होती. याप्रसंगी नातेवाइकांनी तिला त्याच ठिकाणाहून 'आपल्याला फिरायला जायचे आहे' म्हणत कारमध्ये बसवून घेतले. यानंतर आळंदीत नेऊन बळजबरीने एका मंदिरात मुलीचे लग्न लावून घेतले. या लग्नाचे प्रमाणपत्रही संस्थेकडून घेण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.






