प्रशासकीय दिरंगाईची आणि लाल फितशाहीची अनेक उदाहरणे तुम्ही आपल्या आजूबाजूला पाहिलीच असतील. मात्र, जालन्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथील एका आजोबांनी आपली पत्नी आपण हयात असतानाच विधवा महिलांना मिळणारे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाटत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून ते न्याय मागत संबंधित कार्यालयांच्या चकरा मारत आहेत. भिकाजी गाडे असं 71 वर्षीय आजोबांचं नाव आहे.
advertisement
Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणाचे पडसाद, पुण्यातील ग्रामस्थाने घेतला आदर्श निर्णय, Video
भिकाजी गाडे यांना स्वतःच्याच पत्नीने मृत घोषित करून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला आहे, अशी तक्रार पतीनेच जिल्हाअधिकाऱ्यांकडे केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील आठ वर्षांपासून या योजनेचा लाभ महिलेने घेतला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही बाब पतीच्या लक्षात आल्याने पतीने अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन याचा जाब विचारला आहे.
दरम्यान, सतत तक्रारी देऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने नेमका न्याय मागायचा तरी कुणाकडे? असा सवाल तक्रारदार भिकाजी गाडे यांनी उपस्थित केलाय. याबाबत मागील सहा महिन्यांपासून गाडे यांनी ही निराधार योजना मंजूर केली कशी? याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र घनसावंगी तहसीलमधील अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही उत्तर देत नसल्याचे गाडे यांनी म्हटलंय.





