पूर्वी डोंगर माथ्यावर अवतीभोवती झाडे होती. विस्तारलेली वनक्षेत्र होती. हवा, पाणी, पशुपक्षी बीजवाहक म्हणून काम करायचे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन आपोआपच राखले जायचे. सद्यस्थितीत जालना जिल्ह्याचे वनक्षेत्र केवळ 0.40 टक्के एवढेच राहिले आहे. पूर्वीसारखी झाडे राहिली नाहीत, ना पशुपक्षी. त्यामुळे बीज प्रसार अतिशय संथ गतीने होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन जालना बीज उत्सवच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्कृष्ट बीजे संकलित आणि संरक्षित करून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डोंगरमाथा, गायरान, नदी, तलाव क्षेत्र इत्यादी ठिकाणी प्रसारित करण्यात येणार आहेत.
advertisement
Environment Day: एक कृती बदलेल जगाचं भविष्य, पर्यावरण रक्षणासाठी तुमचं योगदान महत्त्वाचं, काय कराल?
जालना शहरात सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून बिजारोपणाचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला. विविध जंगली वृक्षांच्या बिया जिथे माणसांच्या माध्यमातून शक्य नाहीत, अशा ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून टाकण्यात आल्या.
डोंगर, नदीकाठांवर ड्रोनच्या माध्यमातून बीजारोपण करण्यात येतंय. यामुळे जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढीस लागण्यास मदत होईल. शहरातील अनेक सामाजिक संस्था पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहेत. या सगळ्या संस्थांना प्रशासन देखील भक्कम पाठिंबा देत असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.





