ठाकरे गटाचे सर्व ११ नगरसेवक गैरहजर
या निवडणुकीत सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व ११ नगरसेवक मतदानासाठी गैरहजर राहिले. यामध्ये ७ मूळ ठाकरे गटाचे, २ शिंदे गटाला पाठिंबा देणारे आणि २ मनसेचे असूनही ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक होते. गेल्या काही दिवसांपासून 'बेपत्ता' असल्याचे सांगण्यात येणारे नगरसेवक मधुर म्हात्रे, किर्ती ढोणे, राहुल कोट, स्वप्नाली केले हे देखील मतदानासाठी फिरकले नाहीत.
advertisement
महायुतीचे निर्विवाद वर्चस्व
दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्याने महायुतीकडे आधीच मोठे संख्याबळ होते. त्यातच विरोधी बाकांवरील ठाकरे गटाचे नगरसेवक गैरहजर राहिल्याने महायुतीचा विजय अधिकच सुकर झाला. हर्षाली चौधरी आणि राहुल दामले यांच्या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
राजकीय गणिते आणि तर्क-वितर्क
उबाठा गटाचे नगरसेवक ऐन निवडणुकीच्या वेळी गैरहजर का राहिले? याबाबत आता अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मधुर म्हात्रे आणि किती ढोणे यांच्या बेपत्ता असण्यामागे आणि आजच्या गैरहजेरीमागे काही मोठी राजकीय खेळी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विरोधकांनी सभात्याग केला की ही एक रणनीती होती, यावर आता कल्याण-डोंबिवलीत चर्चांना उधाण आले आहे.
