व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार
सध्याच्या तरुण पिढीला व्यायामाची सवय नाही. कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करता ते कामाचा प्रचंड ताण सहन करतात. परिणामी शरीर आणि मन दोन्ही थकलेले असते. याशिवाय फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढल्याने कोलेस्टेरॉल वाढते आणि आवश्यक जीवनसत्त्वांचा (व्हिटॅमिन्स) अभाव निर्माण होतो. रक्ताच्या आणि व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मेंदूवर ताण येतो, विचारांचा ओघ वाढतो आणि मानसिक थकवा येतो. अशी स्थिती डिप्रेशनचा पाया ठरते, अशी माहिती डॉ. सहिंद्रकर यांनी दिली.
advertisement
Reel पाहण्याची नशा फार वाईट, हे वाचून तुम्हाला बसेल शॉक!
यश मिळवण्याची घाई
डॉ. सहिंद्रकर यांच्या मते, आजच्या पिढीमध्ये लवकरात लवकर यश मिळवण्याची मानसिकता वाढली आहे. मोठा बंगला, गाडी, प्रतिष्ठा हे मिळवण्यासाठी वेळ लागतो. या गोष्टींचा जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यावर अनुभव घेणं गरजेचं आहे. वयाच्या 40व्या वर्षी यश आलं तरी ते यशच असतं. पण, सध्याची पिढी असा विचार करत नाही. त्यांना भौतिक सुखाच्या सर्व गोष्टी फार कमी वयात मिळवण्याची इच्छा असते.
वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष
करिअरच्या मागे धावताना अनेक जण वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलतात. यामुळे हार्मोन्सच्या पातळीत बदल होतो आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. लग्न, नोकरी, इतर जबाबदाऱ्या या गोष्टी योग्य वयात पार पडल्या पाहिजेत, असंही डॉक्टर म्हणाले.
मानसिक आरोग्यासाठी तीन मंत्र
योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेचं व्यवस्थापन केल्यास मानसिक आरोग्य सुधारू शकतं. सकारात्मक जीवनशैली स्वीकारल्यास डिप्रेशनपासून दूर राहून यशाच्या मार्गावर चालता येईल, असा सल्ला डॉ. प्रकाश सहिंद्रकर यांनी दिला आहे.