याबाबत मिळालेली माहिती अशी की, अपघातात मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मांडके, नर्मन कात्रे या चौघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, चौघेही तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कारने शनिवारी रात्री निघाले होते. ते महाळंग्रा शिवाराजवळ पोहोचले असताना कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून जोराची धडक दिली.
कार नर्मन कात्रे चालवत होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर ट्रॅक्टरला मागून जोराची धडक बसली. यात नर्मनसह मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मांडके यांचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम लंकाढाई हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लातूरमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर: जावयाकडून सासऱ्याचा चाकूने भोसकून खून
दारू पिऊन पती मारहाण करत असल्याने पत्नी माहेरी निघून गेली. तिला घ्यायला पती तिच्या माहेरी आल्यानंतर सासऱ्याने पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या जावयाने सासऱ्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना चिकलठाणा येथील धनगर गल्लीत घडली आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी जावयास अटक केली आहे. दत्ता रामराव पाटोळे असे संशयित जावयाचे तर सूर्यभान फकीरचंद रिठे असे खून झालेल्या सासऱ्याचे नाव आहे.
