याबाबत मिळालेली माहिती अशी की, माळेगाव इथं व्यंकट हालसे हे त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत राहतात. दीड एकर शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यानं दोन्ही मुलांना इंग्रजी शाळेत घालणं शक्य नव्हतं. तर दुसरीकडे व्यंकट यांची पत्नी भाग्यश्री यांना मुलांनी इंग्रजी शाळेत शिकावं असं वाटत होतं. त्यासाठी पतीकडे मुलांना सीबीएसई शाळेत पाठवण्याची विनंती करत होत्या.
advertisement
आत्महत्येआधी पतीला फोन
पती व्यंकट यांनी पत्नी भाग्यश्रीची अनेकदा समजूत काढली. पण मुलांना इंग्रजी शाळेत शिकवता येत नसल्यानं पत्नी नैराश्यात गेली. शेवटी मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मुलीसह भाग्यश्री यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिथून पतीला फोन करून मुलीचं शेवटचं तोंड पाहा म्हटलं आणि विहिरीत उडी घेतली.
चिमुकला खेळायला गेल्याने वाचला
भाग्यश्री हालसे या मुलीसोबत आत्महत्या करण्यासाठी जात असताना मुलगा बाहेरच खेळत होता. त्यालाही घेऊन त्या निघाल्या होत्या. मात्र खेळण्यासाठी मुलगा सार्थकने हात सोडवून घेत तिथून पळ काढला. मुलगा खेळायला गेल्याने वाचला.
आईच्या निधानानंतर नैराश्यात
भाग्यश्री या गेल्या वर्षभरापासून नैराश्यात होत्या. गेल्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. तेव्हापासून सतत दु:खात असत. आईच्या आठवणीत रडत असायच्या. त्यातून नैराश्य आलं होतं असं भाग्यश्री यांच्या भावाने पोलिसांना सांगितले.
