उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच 'बीबीसी मराठी'ला मुलाखत दिली. यामध्ये विविध मुद्यावर भाष्य करताना बारामतीमधील परिस्थितीवर भाष्य केले. अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर बारामती विधानसभा क्षेत्रात सक्रिय झाले आहेत.
कधी नव्हे ते एवढं लक्ष त्यांनी द्यायला सुरुवात केली आहे. शेवटची प्रचार सभा घेणार अजित पवार आता बारामतीमध्ये ठाण मांडून आहेत. याबाबत अजित पवार यांनी सांगितले की, मी उमेदवार आहे. मतदारसंघात मी असलंच पाहिजे. मतदारसंघातील लोकांनी मी भेटले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. मीदेखील माणूस आहे, थोडी खबरदारी घेणारच, असेही त्यांनी म्हटले.
advertisement
लोकसभेनंतर अजितदादा सतर्क...
अजित पवारांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत आमचा उमेदवार बारामती विधानसभा मतदारसंघातून 48 हजार मतांनी पिछाडीवर होता. त्यामुळे ही मला आधी ही 48 हजारांची पिछाडी भरुन काढावी लागणार आहे. त्यानंतर मिळणारी मते हे मताधिक्य असणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले.
लोकांच्या नाराजीचा फटका?
लोकसभा निवडणुकीत नाराजी भोवली का, यावर बोलताना अजित पवारांनी म्हटले की, त्यावेळी मतदारांनी शरद पवार साहेबांच्या वयाचा विचार करून सुप्रियाला मते दिली. सुप्रियाचा पराभव झाला असता तर पवार साहेबांच्या मनाला लागलं असतं. वाईट वाटलं असतं, असा विचार करून मतदान झाले असल्याचे अजित पवारांनी म्हटले.
अजित पवारांनी बारामतीत मांडलंय ठाण...
अजित पवार यांनी यावेळी बारामतीत ठाण मांडले असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत त्यांच्यासमोर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. बारामतीमध्ये अजित पवारांनी गावभेट दौराही आयोजित करून काही गावांना भेटी दिल्यात.
