राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी 'बोल भिडू'ला दिलेल्या मुलाखतीत राजकीय मुद्यांवर भाष्य केले. शरद पवार यांनी मुलाखतीत सांगितले की, राज्यात सध्या महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण आहे. लोकांचा कल परिवर्तनाकडे दिसत असून आम्हाला चांगलं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात जवळपास 40 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे.
advertisement
किती जागांवर यश मिळणार? पवारांनी आकडा सांगितला...
पक्षातील फुटीनंतर आपल्याला या निवडणुकीत यश मिळेल असा विश्वास व्यक्त करताना शरद पवारांनी याआधी पडलेल्या फुटीनंतरच्या निवडणूक निकालांचा उल्लेख केला. याआधीदेखील मला आमदार सोडून गेले होते. मात्र, त्यातील फार कमीजण पुन्हा निवडणुकीत विजयी झाले. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्याला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 50-60 जागांवर विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या प्रचाराच्या निमित्ताने आपण राज्यात फिरत असून लोकांचा कल लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवारांना नो एन्ट्री
या मुलाखतीत निवडणुकीनंतर जर अजित पवार तुमच्याकडे आले तर त्यांना सोबत घेणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटले की, “आमचा संघर्ष हा विचारधारेचा आहे, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. आम्हाला त्यांची (भारतीय जनता पक्ष) विचारधारा मंजूर नाही. त्यांच्या सोबत काम करणे ही त्यांची (अजित पवार) भूमिका असेल तर कुणालाच प्रवेश देणार नाही”, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
इतर संबंधित बातमी : Ajit Pawar On Yugendra Pawar : काका-पुतण्या वादाचा नवा अंक, अजित पवारांचा युगेंद्रवर पहिला वार...
