काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले?
मला काय मिळालं या पेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं यात माझा आनंद आहे. बहिणींना पैसे मिळाले. औषध, फीचे पैसे मिळाले आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये जनतेचं प्रेम मिळालं, त्यांना वाटतं जनतेला मुख्यमंत्री आहे. जनतेतला मुख्यमंत्री म्हणून ओळख मिळाली, याला खूप नशीब लागतंय. लोकप्रिय मुख्यमंत्री माध्यमांनीच ओळख दिली. मी जनतेसाठी काम केलं.
advertisement
राज्याला पुढे जायचं असेल तर केंद्राची ताकद आपल्यासोबत आहे. केंद्राची मदत कायम लागणार आहे. आता राज्यात जे काही बहुमत मिळालं आहे. कुठे घोड आडलं आहे, मी काहीही धरू ठेवलं नव्हतं. कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ पद मिळालं आहे.
मी काल पंतप्रधान मोदींना फोन केला आणि सांगितलं सरकार बनवताना कोणती अडचणीचं काही आहे तर माझ्यामुळे कुणामुळे तर कधी मनात आणू नका. अडीच वर्ष संधी दिली. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, तो निर्णय आम्हाला मान्य असेल. एनडीएचे प्रमुख म्हणून तुमचा निर्णय मान्य असेल. माझ्यामुळे सत्ता स्थापनेत कोणतीही अडचण येणार नाही. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेताना एकनाथ शिंदेची अडचण होणार नाही. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल हे मला आणि शिवसेनेला मान्य असेल.
Eknath Shinde: देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा? एकनाथ शिंदे काय म्हणाले?
