ही आहेत चोरीची 'हॉटस्पॉट'
पोलिसांच्या मते सरकारवाडा, पंचवटी आणि मुंबई नाका ही क्षेत्रे दुचाकी चोरीचे मुख्य केंद्र बनली आहेत. सार्वजनिक स्थळे, गर्दीची ठिकाणे, शासकीय कार्यालये आणि रुग्णालयांच्या परिसरातून वाहने गायब होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. धक्कादायक म्हणजे, घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्याही आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत.
चुकीला माफी नाही! मुंबईत अवैध पार्किंग महागात पडणार, थेट FIR दाखल होणार, पाहा नवे नियम
advertisement
पाच मिनिटांत दोन बर्गमन लंपास!
चोरट्यांच्या धाडसाचा कळस नुकताच पाहायला मिळाला. जुने नाशिकमधील चौक मंडई परिसरातून सकाळी पावणेअकराच्या सुमारास चोरट्यांनी एक 'बर्गमन' दुचाकी चोरली. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत, त्याच दुचाकीचा वापर करून राजीव गांधी भवनसमोरील सुयोजित बिल्डिंगच्या पार्किंगमधून दुसरी 'बर्गमन' लंपास केली. या थरारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
कागदावरचे पथक अन् पोलिसांचा 'जावईशोध'
वाहन चोरी रोखण्यासाठी गुन्हे शाखेने स्वतंत्र पथक नियुक्त केले असले तरी त्याचा प्रभाव शून्य दिसत आहे. "आमच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणे जास्त असल्याने चोऱ्या होतात," असा अजब 'जावईशोध' लावून पोलिस आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
आकडेवारी काय सांगते?
- गेल्या सहा महिन्यांतील चोरी:390 दुचाकी
- जानेवारीतील चोरी:62 दुचाकी
- गोदाघाट परिसर:चोरीचे 40 टक्के प्रमाण
- सर्वाधिक चोऱ्यांचा काळ:ऑक्टोबर ते नोव्हेंबर
गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सांगितले.






