महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रीती संगम येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केले. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आणि दादांनी आम्हाला दिलेला विचार हे पुढे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सुरु ठेवण्याच्या कर्तव्याच्या भावनेतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी आल्याचे तटकरे यांनी सांगितले. उद्याच्या महाराष्ट्रासाठीचे योगदान सुनेत्रा पवार देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
advertisement
>> विलीनीकरणावर भाष्य काय केलं?
विलीनीकरणाच्या प्रश्नांवर सुनिल तटकरे यांनी म्हटले की, आज आम्ही एनडीमध्ये सत्तेत आहोत. एनडीएच्या विचारांशी जे सुसंगत आहे ज्यांना एनडीमध्ये यायचं त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतर अधिक स्पष्टता येईल असं सूचक विधान तटकरेंनी केलं.
अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी अजित पवारांनी एनडीए मध्ये निर्धारपूर्वक सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यावर विधानसभा निवडणूक विजयाने शिक्कामोर्तब झालं आहे. प्रत्येक जण टीका टिप्पणी करत असतात . संजय राऊत यांची देखील टीका यापेक्षा वेगळी नसणार असेही तटकरे यांनी म्हटले.
तटकरे यांनी पुढे म्हटले की, विलीनीकरण बाबत चर्चा होत असली तरी कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात विलीनीकरण याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. शशिकांत शिंदे यांनी भावनिक होऊन प्रतिक्रिया दिली. त्याबाबत अधिक कळलं तर नक्की बोलता येईल, असेही तटकरे यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजित दादांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे .त्यामुळे नेता निवडण्याचा अधिकार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आम्ही एनडीए सोबत आहोत, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
भाजप हा केंद्रातील आणि राज्यातील मोठा पक्ष आहे. राष्ट्रवादी पक्ष हा मित्र पक्ष म्हणून त्याचा सोबत आहे. भाजपने आम्ही काय निर्णय घ्यावे हे कधी ही सांगितलेले नाही. राष्ट्रवादी स्वतंत्र बाण्याचा पक्ष आहे. आमचे निर्णय आम्ही घेऊ असेही त्यांनी म्हटले.
