राज्यसभेच्या जागेबाबत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संभाव्य वाद टाळण्यासाठी सावध भूमिका घेतली. या घडामोडींची माहिती उद्धव ठाकरे खासदारांना देत होते. या दरम्यान ठाकरेंच्या संबोधनामध्ये प्रियांका चतुर्वेदी यांनी आक्रमक पवित्रा घेत I want to protest. Why Sanjay Raut was giving a statement about Sharad Pawar? असा प्रश्न केला. चतुर्वेदी यांच्या या अनपेक्षित प्रश्नाने बैठकीतील वातावरण तापले.
advertisement
उद्धव म्हणाले, ''मी पक्षप्रमुख, संजय राऊत...''
चतुर्वेदी यांच्या आक्षेपावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सुनावले की, "संजय राऊत बोलले म्हणून काय झाले? पक्षाचा प्रमुख मी आहे आणि अंतिम निर्णय मीच घेईन." असे स्पष्ट करत संजय राऊत यांची बाजू घेतली.
बैठक संपल्यानंतर एका खासदाऱ्याने प्रियंका चतुर्वेदी यांना ६ वर्षे संधी देऊन देखील काय उपयोग झाला असा सवाल देखील मराठवाड्यातील एका खासदाराने उद्धव ठाकरे यांना केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आदित्य ठाकरे यांचे बैठकीत मौन...
खासदारांच्या बैठकीत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांना प्रकृती कारणास्तव काही मर्यादा आहेत. मग, आदित्य ठाकरे महाराष्ट्रात का फिरत नाहीत, अशी तक्रार संजय राऊत यांच्या घरी झाली तेव्हा खासदारांनी केली होती. त्यानंतर बैठकीत उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी खासदारांशी कुठलाही संवाद साधला नसल्याचे सांगण्यात येते.
